महानगरपालिकेकडून होणारा सुरक्षारक्षकांवरील खर्च कमी करा- शशांक बावचकर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महानगरपालिकेकडून होणारा सुरक्षारक्षकांवरील खर्च कमी करा- शशांक बावचकर

इचलकरंजी-
इचलकरंजी महापलिकेतील सुरक्षा रक्षकांवरील खर्च कमी करावा याबाबतचे निवेदन शशांक बावचकर यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे.
इचलकरंजी नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर तत्कालीन महानगरपालिका आयुक्तांनी प्रशासकीय ठराव दिनांक ५-७-२०२२ प्रमाणे ‘महाराष्ट्र शासनाच्या’ महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कार्पोरेशन या संस्थेबरोबर करार करून नऊ सुरक्षारक्षक व एक सुरक्षा अधिकारी नियुक्त करण्यास मान्यता दिली होती.इचलकरंजी महानगरपापालिकेवर येणारे मोर्चे, आंदोलने,संप या सतत होणाऱ्या बाबींमुळे सुरक्षारक्षक नेमणे आवश्यक आहे असे ठरावात म्हटले असले तरी इचलकरंजी शहरांमध्ये नगरपालिका व महानगरपालिका याच्या अंदाजे १३० वर्षाच्या इतिहासात क्वचितच व अपवादाने काही अपघात घडला असावा. तथापि इचलकरंजी शहरातील महानगरपालिके अंतर्गत येणारे दैनंदिन प्रश्न महानगरपालिका प्रशासनाने सत्वर व तातडीने सोडवले तर असे आंदोलन किंवा मोर्चे निघण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. इचलकरंजी शहर हे औद्योगिक शहर असल्याने रोजच्या जीवनामध्ये आंदोलन मोर्चे करण्यास कोणालाही उसंत नसते.इचलकरंजी महानगरपालिकेने सुरुवातीला असणारे नऊ सुरक्षारक्षक वाढवून आता त्याची संख्या अंदाजे २८ वर गेली आहे. २८ सुरक्षा रक्षक व १ सुरक्षा अधिकारी असा सुरक्षा व्यवस्थेवरील महानगरपालिकेचा एकूण होणारा वार्षिक खर्च अंदाजे एक ते सव्वा कोटी रुपये इतका आहे मुळातच महानगरपालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत गंभीर असताना सुरक्षा व्यवस्थेवर अनाठायी व अनावश्यक खर्च करणे योग्य वाटत नाही. इचलकरंजी महानगरपालिकेला सध्या केवळ कामगारांच्या वेतनापुरती सहाय्यक अनुदान उपलब्ध होते यामुळे महापालिकेला विकास कामांवरती खर्च करता येणे शक्य नाही. सबब इचलकरंजी महानगरपालिकेने महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कार्पोरेशन सोबत केलेल्या तीन वर्षाच्या कराराची मुदत दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी संपत असून त्यानंतर सुरक्षा रक्षक नियुक्त करणे बाबतचा खर्च कमी करण्यात यावा असे निवेदनात बावचकर यांनी म्हंटले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More