साने गुरुजी संवाद यात्रेचे इचलकरंजीत जल्लोषी स्वागत
इचलकरंजी : साने गुरुजी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त राष्ट्र सेवा दल आणि समविचारी संस्था आयोजित संवाद यात्रेचे इचलकरंजीत उत्साहात स्वागत करण्यात आले.
एन डी मगदूम विद्यामंदिर येथील स्वागत सत्राचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक पाटील यांनी केले. यात्रेत सहभागी साथींचे लोकनायक पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. सदाशिव मगदूम यांनी बालचमूसाठी गाण्यांचे सादरीकरण केले. बाबासाहेब नदाफ यांनी श्यामची आई पुस्तकातील संस्कारक्षम कथा सांगितल्या. बजरंग लोणारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय एकात्मतेचा संस्कार करणाऱ्या यदुनाथ थत्ते लिखित प्रतिज्ञा पुस्तकाच्या विशेष आवृत्तीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
संस्थेचे तथा रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष पाटील अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले, ” जीवन रुक्ष व्हायचे नसेल तर भावनेचा ओलावा टिकायला हवा आणि त्यासाठी साने गुरुजी माऊलीचे विचार व साहित्य पुन्हा जनमानसात रुजवावे लागणार आहे. “
यावेळी अनिल होगाडे, शरद वास्कर, अशोक वरुटे, रोहित दळवी, संजीवनी चिंगळे, सुषमा साळुंखे, अमोल पाटील, वैभवी आढाव, कोमल माने, गौरी कोळेकर, दामोदर कोळी, प्रशांत खांडेकर, सूरज भोसले आदिंसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
सारिका चौधरी यांनी सूत्रसंचालन केले तर संतोष चव्हाण यांनी आभार मानले

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800