टेंपोचालकांची धोकादायक वाहतुक सुरूच.लालकापड बांधून नियम मोडण्याची परवानगी कोणी दिली?

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

टेंपोचालकांची धोकादायक वाहतुक सुरूच.लालकापड बांधून नियम मोडण्याची परवानगी कोणी दिली?

रस्त्यात असलेले अवजड बीम

इचलकरंजी
इचलकरंजी शहरात टेंपोचालकांकडून धोकादायक वाहतूक सुरूच असून २ महिन्यांपूर्वी एकाचा जीव जाऊनही काही टेंपोचालकांच्या अरेरावीने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे.
वाहतूक पोलिसांकडून सांगितल्यावरच जुजबी कारवाई होत असून तोपर्यत बघ्याची भुमिका घेण्यामागे कोणता अर्थ दडला आहे अशी उघड विचारणा आता नागरिकांतून होऊ लागली आहे.
वस्त्रोद्योग इचलकरंजी शहराचा प्रमुख व्यवसाय आहे,सायझिंगमधून बिमे कारखानदाराना पोहोच करणे हे काम टेंपोचालक वर्षानुवर्षे करत आहेत,सद्यस्थितीत आधुनिक यंत्रमागामुळे मोठ्या आकाराचे साधारण सव्वा ते दीड टनाचे एक बीम होऊ लागले आहे,ते पोहोच करण्यासाठी लहान टेंपोचा वापर केल्याने ते वाहनाच्या बाहेर येते.यातून छोटेमोठे अपघात घडत असतात.२ महिन्यांपूर्वी एक अपघातात दुचाकीवरील सेंट्रीग कामगाराचा मृत्यू झाला होता.त्याचा अक्षरशः मेंदू बिमाला चिकटला होता.
याबाबत इनामने सायझिंग असोसिएशनला निवेदन दिल्यानंतर त्यांनी १५ दिवसात यामध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते.
एकीकडे पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर टेंपोचालकांनी संप पुकारला त्यांची शहापूर पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासमवेत बैठक झाली होती,त्यावेळी नियमबाह्य वाहतूक करता येणार नाही असे ठरले असताना काही प्रमाणात कमी वेगात लाल कापड झाकून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु होती.त्यानुसार बऱ्यापैकी टेम्पोचालकानी सुधारणा केली परंतु काही मोजक्या टेंपोचालकांकडून सर्रास धोकादायक वाहतूक सुरू आहे.
याकडे वाहतूक पोलीसही निदर्शनास आणून दिल्यावर कारवाईं करत आहेत.यामागे कुणाचा दबाव आहे आणि कोण धोकादायक वाहतुकीस पाठीशी घालत आहे? नागरिकांच्या जिवापेक्षा कोणता व्यवसाय मोठा आहे का अशीही विचारणा होत असून त्वरित धोकादायक वाहतूक बंद व्हावी अशी मागणी जोर धरत आहे.
लाल कापड बांधल्यावर सर्वाना नियम मोडण्यास परवानगी द्या-
लाल कापड बांधून वाहतूक करण्याचा मार्ग उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या बैठकीत ठरला आणि त्यानुसार काही काळ वाहतूक सुरू झाली,दुचाकीस्वार व इतर वाहनाधारकांच्या गाड्या रस्त्यावर असल्यास ज्या तत्परतेने क्रेन कारवाई करते तशी इथे का होत नाही,कोणत्या अर्थाने खाते उदासीन झाले आहे असे प्रश्न नागरिक विचारत असून दंड करताना अथवा गाडी उचलताना,लायसन नसल्यावर,ट्रिपल सीट असताना लाल कापड दाखवले तर सुट द्यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे..
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More