कार्तिक वारी दिंड्यांच्या वाहनांना टोल मुक्तीसाठी प्रयत्नशील-आम.आवाडे
इचलकरंजी-
आषाढी वारीच्या धर्तीवर कार्तिक वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यांच्या वाहनांना टोलमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून प्रयत्नशील राहू अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी वारकरी साहित्य परिषदेचे इचलकरंजी शहराध्यक्ष धर्मराज जाधव यांना दिली.
श्रीक्षेत्र पंढरपूर विठ्ठलाची कार्तिक वारी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भासह, महाराष्ट्र, कर्नाटकातून मोठ्या संख्येने दिंड्या पंढरपूरला रवाना होत असतात. या दिंड्यात वारकऱ्यांच्या सोयीसाठी काही वाहनांचा समावेश असतो. राज्य सरकारने आषाढी वारीच्या वेळेस काही दिवसासाठी वारकऱ्यांच्या दिंड्यासाठी टोलमुक्ती जाहीर केली होती पण कार्तिक वारीसाठी हा नियम लागू न केल्याने गेल्या वर्षी वारकऱ्यांच्या संताप व्यक्त होत होता. या वाहनांना टोलमुक्त करावे असे निवेदन वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे यांना धर्मराज जाधव यांनी आज दिले. यावेळी त्यानी टोलमुक्तीसाठी प्रयत्नशील प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800