पाणी योजने साठी ” इचलकरंजी नागरिक मंच ” चे २७ सप्टेंबर रोजी लाक्षणिक उपोषण व ३० सप्टेंबर रोजी मुक मोर्चा.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पाणी योजने साठी ” इचलकरंजी नागरिक मंच ” चे २७ सप्टेंबर रोजी लाक्षणिक उपोषण व ३० सप्टेंबर रोजी मुक मोर्चा.

इचलकरंजी:
सुळकूड योजना कार्यान्वित व्हावी यासाठी, इचलकरंजी शहरातील नागरिकांच्या आग्रहास्तव व इनाम कार्यकर्त्यांच्या भावनाचा विचार करत  इनामने २७ सप्टेंबर रोजी अन्नत्याग आंदोलन व ३० सप्टेंबर रोजी मुक मोर्चाचे आयोजन केल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे.
इचलकरंजी शहराचा पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे, सद्यस्थितीत इचलकरंजी शहराला सुळकुड बांधारा पाणीयोजना मंजुर आहे, कागल परिसरातील राजकीय नेत्यांनी स्वार्थी राजकारण करून विरोध केल्याने सदर योजनेच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण झाला आहे.याबाबत निर्णय मुख्यमंत्री महोदयांकडे प्रलंबित आहे.
सदर योजनेस सुरवातीला समर्थन देऊन विरोध केलेले,रक्तपाताची भाषा वापरलेले पालकमंत्री हसन मुश्रीफ २७ सप्टेंबर रोजी इचलकरंजी शहरात येत आहेत. मंजुर योजनेत आडकाठी घातलेल्या नेत्यांना फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी इचलकरंजी शहरातील कागलकरांच्या मताची आठवण येत आहे त्या निषेधार्थ  इचलकरंजीकर नागरिक पाणीप्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यत विविध लोकशाही मार्गाने आंदोलने करत आहेत.
शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने  महात्मा गांधी पुतळा येथे सकाळी १० ते ५ वाजेपर्यत अन्नत्याग आंदोलन करणार आहोत. 
तसेच सोमवार दिनांक  ३० सप्टेंबर २०२४  रोजी शासन मिटिंग लाऊन पाणी योजनेचा निर्णय करत नसल्याबाबत व शहरावसीयांच्या भावना बेदखल करत असल्याबाबत सकाळी १० वाजता मूक मोर्चाने महात्मा गांधी पुतळा ते प्रांत कार्यालय येथे चालत जाऊन निवेदन देणार आहोत.  यासाठी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था यांना भेटून पत्राद्वारे वरील दोन्ही उपक्रमास पाठिंबा द्यावा याकरिता मोहीम राबवणार असल्याचे इनामने शेवटी म्हंटले आहे.
पाणीप्रश्नी झालेल्या बैठकीस इनामचे उमेश पाटील,राजु कोन्नुर,सुहास पाटील,उदयसिंह निंबाळकर,अमित बियाणी,शितल मगदुम,विद्यासागर चराटे,दयानंद लिपारे,अमोल ढवळे, अरुण बांगड,अभिजीत पटवा उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More