संपूर्ण शहराच्या पाणी पुरवठ्याचे काटेकोर पणे नियोजन करून पाणीपुरवठा सुरळीत करा-आयुक्त पल्लवी पाटील.
इचलकरंजी
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने इचलकरंजी शहरास पाणीपुरवठा होत असलेल्या कृष्णा आणि पंचगंगा नदी पात्रातील पाणी पातळी सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेकडून होणारा पाणी उपसा यावर त्याचा काही अंशी परिणाम झाल्याने शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याबद्दल विविध माध्यमांद्वारे प्राप्त होत असलेल्या तक्रारी निदर्शनास आलेने आयुक्त पल्लवी पाटील यांनी तातडीने महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या समवेत बैठकीचे आयोजन केले होते.
सदर बैठकीत आयुक्त पल्लवी पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील पाणी पुरवठ्याच्या नियोजनाचा आढावा घेवून संपूर्ण शहरात सम प्रमाणात आणि एक दिवस आड पाणी पुरवठा होण्यासाठी काटेकोर नियोजन करणेचे आदेश पाणी पुरवठा विभागास दिले. त्याचबरोबर एखाद्या भागात पाणी पुरवठा होत असलेल्या दोन पाईप लाईन असतील तर त्या पैकी एक पाईफ लाईन बंद करणे च्या सुचना दिल्या.
सम प्रमाणात पाणी पुरवठा करत असताना कोणत्याही प्रकारच्या दबावास बळी पडू नये अशी सूचना केली तसेच असे प्रकार घडलेस सदर बाब आपल्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आपण खंबीरपणे अधिकारी कर्मचारी यांच्या पाठीशी उभे राहणेची ग्वाही आयुक्त यांनी यावेळी दिली.
या बैठकीस प्र.कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर, शाखा अभियंता बाजी कांबळे यांचे सह पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी तसेच विविध प्रभागातील पाणी सोडणारे कर्मचारी उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800