वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंडळ स्थापन करण्याचा समाजाच्या बैठकीत निर्णय.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंडळ स्थापन करण्याचा समाजाच्या बैठकीत निर्णय.

इचलकरंजी:
 लिंगायत समाजाच्या विकासासाठी नवीन वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंडळ स्थापन करण्याचा एकमुखी निर्णय आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला. समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी शासनदरबारी प्रभावी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच, लिंगायत समाजाचा व्यापक मेळावा लवकरच आयोजित करून समाजाच्या प्रगतीसाठी ठोस दिशा ठरवण्याचा निर्णय झाला.
ही बैठक आज जिजामाता मार्केट, गायत्री भवनजवळ येथे झाली. अशोकराव स्वामी (आण्णा) यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत लिंगायत समाजाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. माजी नगरसेवक प्रकाश पाटील, अ‍ॅड. विजय हावळे, बाळासाहेब पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
जगत ज्योती बसवेश्वरांचा पुतळा लवकरात लवकर बसवणे,लिंगायत समाज रुद्रभूमीचे नूतनीकरण आणि सर्व सुविधांचा विकास, रुद्रभूमी, मंदिरे आणि शिक्षण मंडळाच्या माध्यमातून समाजातील इतर घटकांनाही सामावून घेणे, लिंगायत समाजातील OBC दाखल्यांसाठी शासनदरबारी प्रयत्न, लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न आणि अल्पसंख्याक दर्जाची मागणी, शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील सर्व घटकांना मिळावा यासाठी प्रयत्नशील राहणे, लिंगायत समाजाच्या युवकांसाठी नोकरी आणि व्यवसायासाठी सवलती मिळवण्याची मागणी यासह समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
या बैठकीत मार्गदर्शन करताना अशोकराव स्वामी यांनी स्पष्ट केले की, ही बैठक कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेच्या विरोधात नसून लिंगायत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. समाजातील सर्व घटकांना संधी मिळावी, त्यांना सामाजिक आणि शैक्षणिक स्तरावर न्याय मिळावा, तसेच समाज संघटित राहून शासनदरबारी आपल्या मागण्या प्रभावीपणे मांडू शकेल, यासाठी नव्या संघटनेची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. लिंगायत समाजात ४० हून अधिक जाती आणि ३५० हून अधिक पोटजाती असल्याने समाज विखुरला गेला आहे. त्यामुळे समाजाला सरकारी योजनांपासून शैक्षणिक आणि औद्योगिक सवलतींपर्यंत अनेक बाबतीत मागे राहावे लागले आहे. या सर्व अडचणी दूर करण्यासाठी नव्या संघटनेच्या माध्यमातून ठोस प्रयत्न केले जातील, असे ठरवण्यात आले.
या बैठकीत लिंगायत समाजाच्या व्यापक मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. समाजाचा विकास म्हणजे काही व्यक्तींच्या प्रगतीपुरता मर्यादित राहू नये, तर संपूर्ण समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, हा या नव्या मंडळाचा उद्देश आहे. त्यामुळे सर्व समाजबांधवांनी नव्या संघटनेला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले.
या बैठकीत भारत मुरदुंडे, सुनील तोडकर डॉ चंद्रकांत लिगाडे, सदा मलाबादे,सुप्रिया मजले,गीता कुरुंदवाडे,सुरेंद्र माळी,रमेश तनवीरे,कलगोंडा पाटील,संजय नागुरे,चिदानंद कोटगी,बाळगोंडा पाटील,गणेश तेलनाडे,शशिकांत पाटील, प्रवीण पाटील,शिवगोंड पाटील,शिवबसू खोत,बाबू पानोरी, सुपुत्र चौगुले,सचिन माळी,शशिकांत नेजे,नागेंद्र पाटील अरुण कुंभार,सुनील चिंगळे,शंकर बिल्लूर,सचिन कोरे, सुरेश जमदाडे,किरण स्वामी,उमेश पाटील,राजु तारदाळे, बाळकृष्ण मिठारे,संतोष पाटील,सचिन मडिवाळ यांच्या सह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More