वंदे भारत एक्सप्रेस मुंबईपर्यंत करणेची व हातकणंगले थांब्याची दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनची मागणी
इचलकरंजी १९ :
वंदे भारत रेल्वेमार्ग कोल्हापूर ते मुंबई करणेचे व वेळ पहाटे ५.३० करणेचे निवेदन दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनतर्फे केंद्रीय रेल्वेमंत्री मा.अश्विनी वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा. व्ही. सोमाण्णा यांना पाठविणेत आले.
सदर निवेदनामध्ये सोमवार दि. १६/०९/२०२४ रोजी पासून वंदे भारत रल्वे कोल्हापूर ते पूणे सुरू झाली याबद्दल आभार माणले आहे. गतीशिल दळणवळणाचे साधन म्हणून या वंदे भारत रेल्वेकडे पाहिले जाते. परंतू सदरची वंदे भारत रेल्वे कोल्हापूर ते पुणे ऐवजी कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर धावणे कोल्हापूर, सांगली येथील उद्योग, व्यापार व पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर या वंदे भारत रेल्वेची वेळ कोल्हापूर येथून सुटतानाची पहाटे ५.३० वाजताची असावी. जेणेकरून पूणे किंवा मुंबईमध्ये कार्यालयीन वेळेत प्रवाशांना पोहोचता येईल. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठे औद्योगिक व व्यापारी शहर म्हणून इचलकरंजीची ओळख आहे. येथील व्यापारी, उद्योजक पूणे व मुंबई येथे व्यापाऱ्यांच्या निमीत्ताने तसेच पुढील प्रवासासाठी रेल्वे अथवा विमान पकडणेसाठी प्रवास करतात. त्यामुळे इचलकरंजीकरांच्या सोईसाठी हातकणंगले येथे २ मिनीटांचा थांबा जाता व येता देणेत यावा. यामुळे या वंदे भारत रेल्वेने प्रवास करणाऱ्या इचलकरंजी व परिसरातील प्रवाशांना सोईचे होईल. याचबरोबरीने या वंदे भारत रेल्वेचे प्रवास भाडे सर्वांनाच परवडनारे व माफक असावे. जेणेकरून या वंदे भारत रेल्वेला प्रवाशांची संख्या कमी होणार नाही. व रेल्वे सातत्यपूर्ण सुरू राहिल असे निवेदनात नमुद केले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800