महापालिकेचे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आयुक्तांची बदली होणार-आम.आवाडेना जनतेने जाब विचारावा,चाळके मोरबाळे यांचे आवाहन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महापालिकेचे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आयुक्तांची बदली होणार-आम.आवाडेना जनतेने जाब विचारावा,चाळके मोरबाळे यांचे आवाहन

इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेचे मा. आयुक्त यांची २ दिवसांत बदली होणार आहे अशी माहिती मँचेस्टर आघाडीचे सागर चाळके व प्रकाश मोरबाळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
आमदार प्रकाश आवाडे हे सातत्याने आयुक्तांच्या बदलीसाठी पाठपुरावा करीत आहेत.आमदारानी सुचविलेले बेकायदेशीर कामासाठी आयुक्त विरोध करीत असलेने खोट्या प्रतिष्ठेसाठी आवाडे हे चांगल्या अधिकाऱ्यांचा राजकीय दबाव टाकून व मानसिक त्रास देऊन बळी देत आहेत. गेल्या ६ महिन्यापासून याच्या ऐवजी इचलकरंजी शहराचा ज्वलंत प्रश्न असलेला पाण्यासाठी वेळोवेळी शासन दरबारी मिटींगा लावून हा प्रश्न सोडवता आला असता इचलकरंजी शहरामध्ये नविन ६ पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार असून त्यासाठी शासनाकडून २६.४७ कोटी निधी मंजूर करणेत आलेला आहे. संबंधीत टेंडर महानगरपालिकेने काढले असते तर यामध्ये ५.१८ कोटी रूपये बचत झाली असता आमदारांच्या हाटमोरे पणामुळे महानगरपालिकेचे ५.१८ कोटी रूपये नुकसान होत आहे. महानगरपालिकेमध्ये सक्षम अधिकारी असताना एम जी पी कडून टेंडर काढणेचा आमदारांचा भ्रष्ट हेतू दिसतो. तसेच ५.१८ कोटी रूपये एम जी पी कडे वर्ग करावे लागणार आहेत. महानगरपालिकेचे आर्थिक परिस्थिती चांगली नाही. आम्ही सातत्याने पाण्याच्या योजनेसाठी पाठपुरावा करीत आहे. परंतु अद्याप त्यास यश आलेले नाही. जर का पाणीच मिळणार नसेल तर त्या टाक्या बांधून उपयोग काय? गावातील रस्ते व गटरीसाठी शासनाने ५१ कोटी ५० लाख रूपये मंजूर केलेले आहेत. त्यापैकी ३०% हिस्सा म्हणजे १७ कोटी रूपये महानगरपालिकेस भरावे लागणार आहेत. जर ही सर्व कामे एम जी पी व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करणार असतील तर इचलकरंजीतील आयुक्त,३ उपायुक्त,२ सहाय्यक आयुक्त, नगरअभियंता व पाणीपुरवठा अभियंता यांचे काय काम असणार आहे. आमच्या सारख्या सामान्य नागरीकांना हा प्रश्न पडतो की महानगरपालिका करून जनतेला त्याचा काय उपयोग झाला त्यापेक्षा महानगरपालिका बरखास्त केलेली बरी आणि अशा बेकायदेशीर कामांना आयुक्त हे विरोध करत असलेने मा. प्रकाश आवाडे हे त्यांच्या बदलीसाठी कार्यरत आहेत. या सर्व बाबीचा विचार करता इचलकरंजी शहरातील नागरीकांनी जनतेच्या पैशाचा होणार अपव्यव व अहंकारी आमदार प्रकाश आवाडे यांना जाब विचारावा असेही आवाहन चाळके व मोरबाळे यांनी केले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More