इचलकरंजीच्या पाणीपुरवठा योजनेस गती मिळणार? खा. धैर्यशील माने यांची मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावण्याची मागणी
इचलकरंजी
इचलकरंजी शहराला २ ते ३ दिवसाआड पाणी मिळत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहराच्या पाणीटंचाईवर तोडगा म्हणून सुळकुड (ता. कागल) येथून पाणी आणण्याची १६० कोटींची योजना मंजूर झाली आहे, मात्र काही गावांच्या विरोधामुळे अंमलबजावणी रखडली आहे.
योजनेला गती देण्यासाठी इचलकरंजी नागरिक मंचने खासदार धैर्यशील माने यांची भेट घेऊन ठोस भूमिका घेण्याची मागणी केली होती. तसेच पत्रकार परिषद घेत भूमिकाही मांडली होती ,या मागणीच्या पार्श्वभूमीवर खा. माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून तातडीने बैठक घेण्याची विनंती केली आहे.
या बैठकीत संबंधित मंत्री, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहून मार्ग काढावा,अशी मागणी त्यांनी केली आहे. इचलकरंजी नागरिक मंचनेही योजनेच्या त्वरित अंमलबजावणीची गरज असल्याचे स्पष्ट केले असून, बैठक झाल्यास सकारात्मक निर्णय होईल व इचलकरंजी शहराचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800