बंगालमधील हिंसाचाराचा इचलकरंजीत विश्व हिंदू परिषदेचा निषेध,राष्ट्रपती राजवटीची मागणी
इचलकरंजी :
वक्फ कायद्याच्या विरोधाच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंदूविरोधी हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथील विश्व हिंदू परिषदेच्या वतीने निषेध करत केंद्र सरकारकडे तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुर्शिदाबाद येथून सुरू झालेला हिंसाचार संपूर्ण बंगालभर पसरला असून, या दंगलीदरम्यान शेकडो हिंदू नागरिकांवर हल्ले झाले, घरे व दुकाने लुटली व जाळली गेली, तसेच डझनभर महिलांवर अत्याचार झाले. प्रशासन दंगलखोरांसमोर निष्क्रिय असल्याचा आरोप करत विश्व हिंदू परिषदेने याचा कडक शब्दांत तीव्र निषेध केला.
“वक्फ कायदा हा केवळ निमित्त होतं, खरा हेतू हिंदूंवर टार्गेट करून त्यांचे अस्तित्व संपवण्याचा आहे,” असा आरोप या वेळी करण्यात आला. दंगलग्रस्त हिंदूंना आधार देण्याऐवजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दंगल भडकवणाऱ्या इमामांची भेट घेणे हा प्रकार संतापजनक असल्याचे विश्व हिंदू परिषदेने सांगितले.
या पार्श्वभूमीवर परिषदेकडून
बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी.,हिंसाचाराची एनआयएकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी., बंगालमधील कायदा-सुव्यवस्था केंद्रीय सुरक्षा दलांकडे सोपवावी., बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांची ओळख पटवून त्यांना देशाबाहेर हाकलून द्यावे,बंगाल-बांगलादेश सीमेवरील संरक्षित ताराचे काम तातडीने सुरू करावे अशा मागण्या करण्यात आल्या.यावेळी सुजित कांबळे,प्रवीण सामंत,बाळासाहेब ओझा, रविकिरण हुक्केरीकर,मुकेश दायमा,अमित कुंभार,मुकुंद उरुणकर,राजू शिंदे,सनतकुमार दायमा,अरविंद शर्मा,अमृत मामा भोसले,श्रीरंग खवरे,माळसाकांत कवडे,बाळासो माने यांसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800