पंचगंगेचा पाणीउपसा बंद,इचलकरंजीत पाणीटंचाई,पाणी जपून वापरण्याचे आयुक्तांचे आवाहन.
इचलकरंजी
इचलकरंजी शहरास कृष्णा आणि पंचगंगा नदी मधुन पाणी पुरवठा करण्यात येतो. सध्या
पंचगंगा नदीची पाणी पातळी किमान पेक्षाही कमी झाल्याने व पाणी जास्त दिवस नदीपत्रात साचून राहिल्याने पाण्यास थोड्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे.
त्यामुळे महानगरपालिकेकडून खबरदारीचा उपाय म्हणून पंचगंगा नदीवरील पाणी उपसा आज पासून बंद करणेत आलेला आहे.
येत्या तीन ते चार दिवसांमध्ये पंचगंगा नदीमध्ये कमाल पातळी होईतो पर्यंत पंचगंगा नदी मधुन पाणी उपसा बंद ठेवण्यात येणार आहे.
यामुळे शहरात काही अंशी पाणीटंचाई भासणार आहे.
याबाबत महानगरपालिका प्रशासन दिलगीर आहे. या अनुषंगाने इचलकरंजी शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपणां कडील उपलब्ध पाणी जपून वापरावे तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पाणी उकळून व गाळून प्यावे असे आवाहन आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांचेकडून करणेत येत आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800