शेतकऱ्यांचा अपमान आणि क्रूर थट्टा करणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा-जिल्हाप्रमुख संजय चौगुले
इचलकरंजी
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन स्थळ पाहणी करण्याचा ढोंगीपणा करणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात मुक्ताफळ उधळली आहेत. या स्थळ पाहणी दौऱ्या दरम्यान शेतकऱ्यांबद्दल अपमानास्पद वागणूक देणारे आणि त्यांची क्रूर थट्टा करणारे विधान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. “पाच-पाच/दहा-दहा वर्ष शेतकरी कर्ज भरत नाहीत आणि सरकारकडून कर्जमाफी होण्याची वाट बघत असतात, कर्जमाफी झाल्यानंतर मुला-मुलींचे साखरपुडे आणि लग्नात सगळा पैसा खर्च करतात,” असं अपमान करणारे वक्तव्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. या निर्दयी कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, कोल्हापूर जिल्ह्याच्यावतीने हीर निषेध केला.
मुळात शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्यानंतर सदरचा सर्व पैसा बँकेच्या खात्यामधून तो सरळ बँकांकडे जमा होत असतो, त्यामुळे कर्जमाफीच्या पैशावरून शेतकऱ्यांनी सणवार कधीच साजरे केलेले नाहीत, असे असताना देखील आधीच दु:खी-कष्टी असलेल्या शेतकरीराजाचा केवळ अपमान, मस्करी आणि थट्टा करण्याच्या हेतूने माणिकराव कोकाटे यांनी हे विधान केलेलं आहे, त्यामुळे त्यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून त्वरित राजीनामा द्यावा किंवा त्यांच्या पक्ष नेतृत्वाने त्यांचा राजीनामा घेऊन त्यांची पक्षातून व मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अन्यथा जोपर्यंत माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होत नाही तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने भविष्यकाळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी दिला.
पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संजय चौगुले

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800