पोषण पुनर्वसन केंद्र बालकांच्या प्रतीक्षेत १४ दिवस उपचार पद्धती मुळे उदासिनता,पालकांनी पुढे येणे आवश्यक

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पोषण पुनर्वसन केंद्र बालकांच्या प्रतीक्षेत
१४ दिवस उपचार पद्धती मुळे उदासिनता,पालकांनी पुढे येणे आवश्यक.
इचलकरंजी:
आयजीएम रुग्णालयात १ ऑगस्ट २०२३ मध्ये कोल्हापूर  जिल्ह्यातील  दुसऱ्या पोषण पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आले होते. या केंद्रा मध्ये वर्षभरात १२६ कुपोषित बालकांच्यावर उपचार करण्यात आले. तर त्यामधील ९० बालकांना कुपोषणा मधून बाहेर काढण्यात वैद्यकीय अधिकार्‍यांना यश आले. सध्या केवळ ३ बालके उपचार घेत आहेत. परंतु आलीकडे केंद्रात उपचारा करिता येणार्‍या बालकांचे प्रमाण घटले आहे. यास पालकांच्या उदासीनते सोबत विविध कारणे असली तरी केंद्रास बालकांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात केवळ गडहिंग्लज येथे पोषण पुनर्वसन केंद्र  होते. बाळ कुपोषित असतांनाही काही पालक गडहिंग्लज केंद्र दूर असल्याचे कारण देत उपचारास  टाळाटाळ करीत होते. परिणामी कुपोषित मुले उपचाराअभावी होती. आयजीएम रुग्णालयात हे  केंद्र सुरू करण्यात आल्याने इचलकरंजी शहर परिसरातील नागरिक याचा लाभ घेतील अशी अपेक्षा होती. त्याप्रमाणे प्रथम मोठ्या प्रमाणात कुपोषित बालक उपचारास रुग्णालयात येत होते. मात्र त्यानंतर कुपोषित बालकांच्या उपचारास येणार्‍या संख्येत घट होत गेली.
आयजीएम रुग्णालयात असलेल्या पोषण पुनर्वसन केंद्र हे दहा बेडचे आहे.पाच वर्षा खालील ज्या बाळांचे वजन-उंची कमी आहे अशा कुपोषित बालकांना उपचारासाठी दाखल केले जाते. या केंद्रात १४ दिवसामध्ये त्यांच्या दैनंदिन दिनचर्या,समतोल आहार,गरजेनुसार औषधोपचाराच्या माध्यमातून उपचार सुरू आहेत.आज पर्यन्त १२६ बालकांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.त्यामधील ३६ बालके दुर्धर आजाराने  ग्रस्त असून ही त्यांच्या प्रकृती मध्ये सकारात्मक सुधारणा करण्यात यश आले आहे.मुलांवर होणारे सकारात्मक परिणाम पाहून अन्य कुपोषित बालकांचे पालक उपचारा करिता येतील अशी अपेक्षा होती. मात्र सध्या पोषण पुनर्वसन केंद्रास बालकांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
  बदली नंतर मोहीम थंडावली.
आयजीएम रुग्णालयात पोषण पुनर्वसन केंद्र सुरू होणे हे सकारात्मक असल्याचे सांगत तत्कालीन महिला व बाल विकास अधिकारी ज्योती पाटील यांनी आपले कर्तव्य चोख बजावले होते.त्यावेळी अंगणवाडी मध्ये घेण्यात येत असलेल्या बाळांच्या नोंदी मधून कुपोषित बाळांचा शोध घेवून त्यांना उपचारा करिता आयजीएम मध्ये पाठविले जात होते. मात्र त्यांच्या बदली नंतर काम थंडावले असल्याचे चित्र आहे.
मत डॉक्टरांचे
कोल्हापूर जिल्ह्यात केवळ दोन पोषण पुनर्वसन केंद्र सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील व्यक्ति आपल्या बाळाला उपचारा करिता आयजीएम रुग्णालयात दाखल करू शकते. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात कुपोषित मुले आढळून येतात. तेथील अंगणवाडी कर्मचारी, प्राथमिक आरोग्य कर्मचार्‍यांनी कुपोषित मुले आढळल्यास पोषण पुनर्वसन केंद्रा मध्ये पाठविणे आवश्यक आहे.
डॉ. संदीप मिरजकर, बालरोग तज्ञ आयजीएम रुग्णालय
आयजीएम पोषण पुनर्वसन केंद्रात १० बेड असून स्वतंत्र स्वयंपाक गृह व तज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध आहेत तर मुलांच्या मनोरंजना करिता खेळणी आहेत
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More