महाविकास आघाडीतर्फे एकच उमेदवार देणार-शशांक बावचकर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महाविकास आघाडीतर्फे एकच उमेदवार देणार-शशांक बावचकर

इचलकरंजी
इचलकरंजी येथे विधानसभेसाठी महाविकास आघाडीतर्फे एकच उमेदवार देण्यात येईल अशी माहिती पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शशांक बावचकर यांनी दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले महाविकास आघाडी कडून काँग्रेस पक्षाकडून राहुल खंजिरे व संजय कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून मदन कारंडे व सुहास जांभळे तसेच मँचेस्टर आघाडी करून सौ.स्मिता तेलनाडे असे पाच उमेदवार इच्छुक असून त्यांनी आपापल्या पक्षाकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे या पाच उमेदवारांपैकीच वरिष्ठांच्या आदेशाने एक उमेदवार विधानसभा निवडणुकीत ठरेल व त्याच्या पाठीमागे संपूर्ण महाविकास आघाडी ताकद लावून उमेदवार विजयी करेल आणि इचलकरंजीतून विधानसभेत महाविकास आघाडीचा आमदार पाठवेल असेही त्यांनी नमूद केले.
प्रकाश आवाडे यांनी गेल्या ५ वर्षात एकही काम केले नसून शहराचा महत्वाचा सुळकुड पाणीप्रश्न त्यांना सोडवता आलेला नाही, त्यामुळे त्यांचा पराभव करण्यासाठी १९९० प्रमाणे सर्वानी एकत्र यावे असे आवाहन सागर चाळके यांनी केले.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांची आज इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीत बैठक झाली. त्या बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेसाठी माजी आमदार अशोकराव जांभळे,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे,समाजवादी पार्टीचे प्रताप होगाडे,मँचेस्टर आघाडीचे सागर चाळके,इचलकरंजी शहर काँग्रेस ब्लॉकचे अध्यक्ष संजय कांबळे,राहुल खंजीरे,सयाजी चव्हाण,सुहास जांभळे प्रकाश मोरबाळे,सुनील बारवाडे,प्रकाश सुतार,वसंत कोरवी, सदा मलाबादे,शिवाजी शिंदे,भरमा  कांबळे उपस्थित होते.

इचलकरंजी बंद नाही

इचलकरंजी येथे गेल्या आठवड्यात बांग्लादेशातील घडामोडीच्या अनुषंगाने बंद झालेला आहे,शहरातील कष्टकरी जनतेला व किरकोळ तसेच सर्व हातावरचे पोट असणाऱ्या व्यापाऱ्यांचे बंदमुळे नुकसान होते त्यामुळे त्यांचा विचार करून बंद करणार नसल्याचे यावेळी महाविकास आघाडीतर्फे नमूद करण्यात आले.

धरणे आंदोलनही रद्द

बदलापूर् येथील शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनंतर इचलकरंजी महाविकास आघाडी यांच्या वतीने शनिवार दिनांक २४ ऑगस्ट २०२४ रोजी महात्मा गांधी पुतळा, इचलकरंजी येथे महिलांवरील अत्याचारा विरोधात निदर्शने व शहर बंद ठेवणेसाठीचे आवाहन करणेत आले होते , मात्र मुंबई उच्च न्यायालयाने बंदला मज्जाव करणेचे आदेश दिले आहेत. सदर आदेशानुसार निदर्शने व बंद पुकारण्यास परवानगी नसलेने , सदर निदर्शने व बंद संबंधित सर्व कार्यक्रम रद्द करणेत आले आहेत असे महाविकास आघाडी तर्फे कळवण्यात आले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More