सुळकुड योजनेच्या त्वरित अंमलबजावणीसाठी इनामच्या अन्नत्याग आंदोलनास उस्फुर्त प्रतिसाद
इचलकरंजी
इचलकरंजी शहरासाठी मंजुर असलेल्या सुळकुड पाणी योजनेच्या अंमलबजावणी साठी इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने महात्मा गांधी पुतळा येथे आयोजित केलेल्याअन्नत्याग आंदोलनाला इचलकरंजीतील सर्वसामान्य नागरिकांसह विविध राजकीय पक्ष, विविध सामाजिक, शैक्षणिक,व्यापारी संस्था संघटना, यांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला.शहराला शुद्ध मुबलक पाणी देणे ही शासनाची जबाबदारी आहे तसेच ‘लढा पाण्यासाठी – पाणी गावासाठी – इनाम गावासाठी’ ही भूमिका घेऊन या प्रश्नाची तीव्रता व जाणीव या अन्नत्याग आंदोलनाद्वारे सरकारला करून देण्यासाठी हे एक दिवसीय आंदोलन आयोजित केले होते. इचलकरंजी नागरिक मंचचे पस्तीस हून अधिक स्त्री – पुरुष कार्यकर्ते मंचचे प्रमुख अभिजीत पटवा यांच्या नेतृत्वाखाली दिवसभर अन्नत्याग करून या आंदोलनात सहभागी झाले होते. या मंचावर सुळकुड पाणी योजनेची गरज आणि त्याचा सर्व इतिहास सांगणारी पोस्टर्स लावण्यात आली होती.यावेळी सोमवार ता.३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता गांधी पुतळा ते प्रांत कार्यालय असा मूक मोर्चा आयोजित केला आहे. त्यात इचलकरंजीकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800