महाविकास आघाडीचे लाक्षणिक उपोषण; विविध प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले इचलकरंजी (प्रतिनिधी) : शहरातील खड्डेमय रस्ते, कचरा संकलन, अस्वच्छता आणि महापालिकेच्या कारभाराविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी महापालिकेसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीतील विविध पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील नागरी समस्यांवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. विरोधी पक्षनेते तथा गटनेते उदयसिंग पाटील यांनी कचरा संकलनाचा मक्ता, शहरातील अस्वच्छता, खड्डेमय रस्ते आणि महापालिकेच्या एकूण कारभारावर सडकून टीका केली. नागरिकांकडून सातत्याने तक्रारी होत असतानाही प्रशासन आणि सत्ताधारी त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. शशांक बावचकर यांनी महापालिका प्रशासन, आयुक्त, महापौर आणि आमदारांच्या भूमिकेवर टीका करत आमदार राहुल आवाडे यांच्या हस्तक्षेपामुळे महापालिका प्रशासनाची दुर्दशा झाल्याचा आरोप केला. नगरसेवक संजय तेलनाडे यांनी शहरातील विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत आमदार राहुल आवाडे यांच्यावरही टीका केली. यावेळी कार्यकर्त्यांनी आमदारांविरोधात घोषणाबाजी केली. सागर चाळके यांनी महापलिकेतील अपुऱ्या नागरी सुविधा व खड्डे यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर