मानवतेसाठी प्रत्येक क्षण समर्पित असावा : सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज रेंदाळ : संत निरंकारी मिशनतर्फे युगदृष्टा बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त हरियाणातील समालखा येथे भव्य संत समागमाचे आयोजन करण्यात आले. श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्मिक चेतनेने भारावलेल्या वातावरणात पार पडलेल्या या समागमाला देश-विदेशातील लाखो श्रद्धाळूंनी उपस्थिती लावली. सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज तसेच निरंकारी राजपिता रमितजी यांच्या सानिध्यात झालेल्या या समागमात भक्तांनी सद्गुरूंच्या अमृतमय विचारांचा लाभ घेत आत्मिक शांती, आनंद आणि दिव्य प्रेरणेचा अनुभव घेतला. यावेळी मार्गदर्शन करताना सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांनी “मानवतेच्या सेवेसाठी प्रत्येक क्षण समर्पित असावा” असा संदेश दिला. प्रेम, सेवा, विनम्रता आणि समर्पण या मूल्यांचा स्वीकार करून समाजात बंधुभाव वाढविण्याचे आवाहनही त्यांनी केले. कोल्हापूर विभागातील १४ शाखांमधून कोल्हापूर शहर, साळवाडी, जयसिंगपूर, मालेवाडी आणि नेरली या पाच ठिकाणी ‘समर्पण दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हजारो भाविक भक्तांनी सहभागी