सहा वर्षांपासून बंद असलेला शहीद भगतसिंग जलतरण तलाव तात्काळ सुरू करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा- उदयसिंग पाटील इचलकरंजी : शहरातील क्रीडाप्रेमी नागरिक, जलतरणपटू, महिला बॅच, विद्यार्थी तसेच नियमित जलतरण करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचा असलेला शहीद भगतसिंग जलतरण तलाव सन २०२० पासून बंद अवस्थेत असून तो तात्काळ सुरू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी दिला आहे. प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आलेल्या मागणीनुसार, तब्बल सहा वर्षे जलतरण तलाव बंद असल्यामुळे हजारो नागरिकांची गैरसोय होत असून महानगरपालिकेलाही मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. या तलावातून दरवर्षी सुमारे १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते तसेच सुमारे ४०० सभासद या सुविधेचा लाभ घेत होते. या कालावधीत अंदाजे ९० लाख रुपयांचे उत्पन्न गमावल्याचा दावा करण्यात आला आहे. सध्या महानगरपालिकेत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती आणि आयुक्त अशी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असतानाही तलावाचे काम रखडल्याबद्दल