परमपूज्य आचार्य श्री वर्धमान सागरजी महाराज यांच्या यम सल्लेखनेचा आठवा दिवस; भक्तांची कुंथलगिरी येथे मोठी गर्दी इचलकरंजी / प्रतिनिधी परमपूज्य आचार्य श्री वर्धमान सागरजी महाराज यांच्या यम सल्लेखना साधनेचा आज आठवा दिवस असून महाराष्ट्रातील सिद्धक्षेत्र कुंथलगिरी येथे देशभरातील जैन समाजातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. आचार्य श्रींनी २३ जून २०२६ रोजी यम सल्लेखना जाहीर केली होती. शांत, संयमी आणि तपस्वी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले आचार्य श्री वर्धमान सागरजी महाराज हे परमपूज्य १०८ संमतीसागरजी महाराज यांचे परमशिष्य आहेत. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव पायगोंडा पाटील असून त्यांचा जन्म ३ जानेवारी १९५१ रोजी निमशिरगाव येथे झाला. त्यांनी बी.एस्सी., बी.एड. शिक्षण पूर्ण करून इचलकरंजीतील शहापूर परिसरातील राजीव गांधी विद्यामंदिर येथे शिक्षक म्हणून कार्य केले व हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. सन २००४ मध्ये इचलकरंजी येथे त्यांचा दीक्षा महोत्सव सोहळा पार पडला होता. त्यानंतर त्यांनी जैन धर्माचा प्रचार-प्रसार, संयम,