प्रधानमंत्री आवास योजनेतून इचलकरंजीत ४३२ घरकुलांचा पहिला टप्पा- माजी मंत्री प्रकाश आवाडे इचलकरंजी: सर्वसामान्य नागरिक व यंत्रमाग उद्योगातील कामगारांना हक्काचे व परवडणारे घर मिळावे यासाठी सांगली नाका-टाकवडे रोड परिसरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ४३२ घरकुलांचा पहिला टप्पा साकारला जात असल्याची माहिती माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी दिली. राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे आयोजित प्रकल्प माहिती कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात प्रत्येकी चार मजली नऊ इमारती उभारण्यात येणार असून पुढील टप्प्यात संपूर्ण मतदारसंघात तीन हजार घरकुले उभारण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र शासनाकडून १.५० लाख व राज्य शासनाकडून १ लाख अशी एकूण २.५० लाख रुपयांची सबसिडी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तसेच बांधकाम कामगारांसाठी अतिरिक्त २ लाखांची सबसिडी उपलब्ध असून आणखी १ लाख रुपयांच्या अनुदानासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आ.राहुल आवाडे यांनी, “कामगारांच्या शहरात प्रत्येकाला स्वतःचे घर मिळण्यासाठी