
इचलकरंजीत पोलिसांवरील वाढते हल्ले; कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह. विशेष वृत्त-अभिजित पटवा
इचलकरंजीत पोलिसांवरील वाढते हल्ले; कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह विशेष वृत्त-अभिजित पटवा इचलकरंजी (प्रतिनिधी) : शहरात गेल्या दोन महिन्यांत पोलिसांवर झालेल्या सलग तीन हल्ल्यांमुळे कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे. कबनूर येथे महापुरुषांचा फलक फाडल्याच्या प्रकरणानंतर निर्माण झालेला तणाव, आंबेडकर जयंतीदरम्यान दोन गटांतील वाद आणि नुकतीच चंदूर येथे घडलेली दगडफेकीची घटना—या तिन्ही प्रकरणांत


