इचलकरंजी न्यायालयातील विशेष लोकअदालतीत ६२ प्रकरणे निकाली; तब्बल ₹२.४३ कोटींची वसुली इचलकरंजी : इचलकरंजी येथील जिल्हा न्यायालयात धनादेश न वटल्याप्रकरणीआयोजित विशेष लोकअदालतीत न्यायालयातील प्रलंबित ६२ प्रकरणांचा तडजोडीने निकाल लावण्यात आला. या माध्यमातून २ कोटी ४३ लाख ९८ हजार ८८९ रुपयांची वसुली करण्यात आली. ही विशेष लोकअदालत मा. एल. डी. बिले, अध्यक्ष, हातकणंगले तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा न्यायाधीश-१, इचलकरंजी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. लोकअदालतीसाठी वित्तीय संस्थांच्या न्यायालयातील २९० प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती, त्यापैकी ६२ प्रकरणे यशस्वीरीत्या निकाली काढण्यात आली. लोकअदालतीसाठी एक पॅनेल नियुक्त करण्यात आले होते. मा. ए. एन. पाटील, निवृत्त जिल्हा न्यायाधीश यांनी पॅनेल प्रमुख म्हणून, तर ॲड. किर्ती जैंद यांनी पॅनेल सदस्य म्हणून काम पाहिले. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी इचलकरंजी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. आर. आर. तोष्णीवाल, उपाध्यक्ष ॲड. राजाराम सुतार, सचिव ॲड. अभिजीत माने, सहसचिव ॲड. आदित्य मुदगल, खजिनदार ॲड. विजय शिंगारे, तसेच ॲड. राहुल काटकर, ॲड. शैलेंद्र रजपूत, ॲड. महेश कांबळे, ॲड. दिपाली