शासकीय भूखंडावरील २०११ पूर्वीची अतिक्रमणे नियमितीकरणासाठी अर्ज वाटप व मार्गदर्शन मेळावा संपन्न इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त शासकीय भूखंडावरील १ जानेवारी २०११ पूर्वीची अतिक्रमणे नियमित करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने अर्ज वाटप व विशेष मार्गदर्शन मेळावा उत्साहात पार पडला. हा मेळावा प्रभाग समिती ‘क’ अंतर्गत शिवमूर्ती नगर येथे विरोधी पक्षनेते उदयसिंह पाटील यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या शासन निर्णय क्र. जमीन-२०२६/प्र.क्र.२०/जमीन १, दिनांक २५ मार्च २०२६ अन्वये अतिक्रमणे नियमित करण्याबाबतच्या तरतुदींची माहिती यावेळी नागरिकांना देण्यात आली. मेळाव्यात पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे, अर्ज सादर करण्याची प्रक्रिया तसेच नियमितीकरणासंदर्भातील विविध शंकांचे निरसन करण्यात आले. सहाय्यक आयुक्त रामचंद्र कांबळे यांनी मेळाव्याचा उद्देश स्पष्ट करत शासनाच्या निर्णयाचा लाभ पात्र नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले. पंतप्रधान आवास योजना विभागाच्या शुभांगी जोशी यांनी शासनाने निश्चित केलेल्या नियम व अटींची सविस्तर माहिती उपस्थितांना