इचलकरंजीत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज’ विषयावर व्याख्यान इचलकरंजी इस्रोसारख्या जागतिक दर्जाच्या संस्था, भारताच्या अण्वस्त्र निर्मितीचा पाया आणि देशाला वैज्ञानिक दृष्टिकोन देत भविष्यासाठी सक्षम बनवण्याचे कार्य पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले. त्यांनी घातलेल्या भक्कम पायावर आज कोविड लसीपासून यूपीआय तंत्रज्ञानापर्यंत भारताने विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात जगाला स्तिमित करणारी झेप घेतली आहे. मात्र आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रूपाने भारत आणि भारतीय आयटी क्षेत्रासमोर मोठे आव्हान उभे आहे. अशा परिस्थितीत विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांना अग्रक्रम देत देशाने वाटचाल करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासक रणजीत यादव यांनी केले. समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालय यांच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित साप्ताहिक चर्चासत्रात ‘वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. रमेश लवटे होते. देवदत्त कुंभार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यादव पुढे म्हणाले की, भविष्यात समर्थ भारत घडवायचा असेल तर आजची आव्हाने स्वीकारून पुढील