ICHMH51NEWS.IN
9921600800

वस्त्रोद्योगाच्या अडचणींकडे केंद्राने लक्ष द्यावे; अशोकराव स्वामी यांची केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडे मागणी

वस्त्रोद्योगाच्या अडचणींकडे केंद्राने लक्ष द्यावे; अशोकराव स्वामी यांची केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडे मागणी छत्रपती संभाजीनगर, ता. २ : महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष अशोकराव स्वामी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगासमोरील गंभीर प्रश्न मांडले. राजस्थानातील पाली, जोधपूर व बालोतरा येथील प्रोसेस उद्योग

वस्त्रोद्योगाच्या अडचणींकडे केंद्राने लक्ष द्यावे; अशोकराव स्वामी यांची केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडे मागणी

वस्त्रोद्योगाच्या अडचणींकडे केंद्राने लक्ष द्यावे; अशोकराव स्वामी यांची केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडे मागणी छत्रपती संभाजीनगर, ता. २ : महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष अशोकराव स्वामी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगासमोरील गंभीर प्रश्न मांडले. राजस्थानातील पाली, जोधपूर व बालोतरा येथील प्रोसेस उद्योग बंद असल्यामुळे महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग संकटात सापडला असून, केंद्र सरकारने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून ४ ऑगस्टच्या उच्च न्यायालयीन सुनावणीत प्रतिज्ञापत्र दाखल करावे, अशी मागणी करण्यात आली. महासंघाने ‘टफ (TUFS)’ योजनेचा लाभ केवळ शटललेस यंत्रमागापुरता मर्यादित न ठेवता साध्या पॉवरलूमसह वस्त्रोद्योगातील सर्व घटकांना लागू करावे, तसेच सीसीआयमार्फत महाराष्ट्रातील सूतगिरण्यांना अनुदानित दरात कापूस उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. राजस्थानातील प्रोसेस उद्योग बंद असल्याने इचलकरंजी, भिवंडी, मालेगाव व विटा येथील उद्योगांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून अनेक पॉवरलूम कारखाने अडचणीत आल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले.

2
Vote Now

कोचिंग सेंटर्स में 10वीं तक के स्टूडेंट्स की एंट्री बंद करने का फैसला क्या सही है?