एन.डी पाटील यांनी सतत प्रबोधनपरंपरेशी जोडून घेतले होते.
प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन
इचलकरंजी:
प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले,महाराष्ट्रातील तमाम शेतकरी, कष्टकरी, पुरोगामी, प्रबोधन चळवळीचे अर्धशतकाहून अधिक काळ प्रा. डॉ.एन.डी.पाटील यांनी एक मुख्य नेतृत्व केले. अलीकडे राजकारणाला केवळ सत्ताकारणाचे स्वरूप आले आहे.पण एन.डी.पाटील यांच्यासारख्या नेत्याकडे नैतिक धाक आणि सत्याची कास यामुळे सत्तेला नमवण्याची मोठी ताकद होती. भारतीय प्रबोधन परंपरेतील सकारात्मकता, सृजनशीलता, भौतिकत्व,विज्ञाननिष्ठा अशी मूल्ये पुढे नेण्याचे काम त्यांनी अथकपणे केले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







